बांगलादेशी नागरिकांचा झारखंड करणार बंदोबस्त   

रांची : बांगलादेशी घुसखोरांची घुसखोरांची ओळख पटवून त्यांना हद्दपार करण्यासाठी विशेष दल स्थापन करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी हेमंत सोरेन सरकारकडे केली आहे. चंपाई सोरेन म्हणाले, बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीमुळे झारखंडची लोकसंख्या झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे आदिवासी समुदायांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. देशातील बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्धच्या लढाईत निर्णायक पाऊल उचलल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. आता, मी राज्य सरकारला झारखंडमधील बांगलादेशी घुसखोरांना ओळखळून त्यांना हद्दपार करण्यासाठी एक कार्य दल स्थापन करण्याची विनंती करत आहे. 

Related Articles